"तिरंगाचा सन्मान व्हावा या करिता अभाविप चे खामगांव तहसीलदारांना निवेदन "खामगांव -अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या ७६ वर्षा पासून अविरतपणे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे हे आपण जाणताच.वर्तमान मध्ये आपला ७७ वा स्वातंत्र दिन आपण आनंदाने व उत्साहाने संपूर्ण भारत देश साजरा करत आहे. वर्तमान मध्ये ध्वजाचा अपमान होत आहे लहान मुले, पक्षाचे व संघटनेचे कार्यकर्ते, सामान्य व्यक्ती हे १५ आॉगस्ट ला ध्वज खरेदी करतात व त्यांचा उपयोग झाल्या नंतर हे रस्त्याच्या कडेला, मैदानावर, कचरा पेठी मध्ये टाकले जातात. विद्यार्थी,छोट्या मुलांच्या हातुन तिरंगा ध्वज खाली पडतात व पायदळी जातात अशी परिस्थिती निर्माण न व्हावी व अशी सूचना शाळा, विद्यालय प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना द्याव्या. प्लॅस्टिक च्या ध्वजा वर विक्रीस बंदी असावी. तसेच वापरण्यावर प्रतिबंध असावा. आपणांस विनंती आहे की प्रशासनाने शाळा, विद्यालय,महाविद्यालय सामाजिक प्रतिष्ठाने, शासकीय कार्यालयं आपले सूचना पत्र द्यावें.त्यावेळी तहसीलदारांनी लवकरात लवकर प्रतिबंध लाऊ व प्रशासनाला कळऊ असे म्हटले आहे. यावेळी. जिल्हा सयोजक ॠषीकेश वाघमारे, नगर मंत्री गणेश कठाळे, नगर सहमंत्री आनंद निकाळजे,पार्थ वराडे,सुयोग चंद्रे,प्रथमेश कोहळे, कार्तिक नेमाने,ओम काळे,शुभम राठोड, सानिका राठोड, वैष्णवी जावरकर,साक्षी करवते आदी अभाविप चे कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post