रामप्रभू तराळे सह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश ...मनोज भगततेल्हारा ता प्रतिनीधीविधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अकोट तेल्हारा तालुक्यातील राम प्रभू तराळे यांच्यासह असंख्य लोकांचा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला . अकोट विधानसभा हा पूर्वीचा शिवसेनेचा बालेकिल्ला होता परंतु त्यानंतर भाजप शिवसेना युतीत तो भाजपला सुटत गेला मान्न यावेळेस हजारो शिवसैनिकांची इच्छा आहे की हा मतदारसंघ आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला पाहिजे यासाठी सर्व कार्यकर्ते कसोशीने तयारीला लागलेले आहेत याचाच एक भाग म्हणून तेल्हारा अकोट तालुक्याच्या दरम्यान असलेले एदलापूर गावातील राष्ट्रवादीचे मोठे नेते रामप्रभू तराळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश घेतला या कार्यक्रमाला आ. नितीन देशमुख जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने, उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे/////////////////////// ///////////बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारा माझा परिवार आहे..रामप्रभू तराळे.. कार्यक्रमांमध्ये बोलताना रामप्रभू तराळे यांनी आपले मत व्यक्त केले की माझा परिवार हा पूर्वीचा शिवसेनेचाच असून बाळासाहेबांच्या विचारांना प्रामाणिकपणे पुढे नेणारा परिवार आहे. म्हणून माझ्या वडिलांनी नेहमी कोणत्याही निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षालाच पाठबळ दिले आणि मतदान केले व आता त्याच विचारांवर चालण्याची गरज मला निर्माण झालेली आहे म्हणून मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश करत आहे. मी पूर्ण ताकदीने अकोट आणि तेल्हारा तालुक्यामध्ये गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक निर्माण करण्याचं काम प्रामाणिकपणे करेलरामप्रभू तराळे///// ///////////////////////////// भाजपाने कशा पद्धतीने महाराष्ट्र लुटला आणि भाजपाला एकच पक्ष हरवू शकतो एकच संघटना हरवू शकते त्याच नाव म्हणजे शिवसेना.ल ही लढाई पूर्ण ताकदीनिशी आपल्याला लढायची आहे आणि रामप्रभू तराळे अकोट आणि तेल्हारा मतदार संघात नव संजीवनी देण्याचं काम करतील असा आशावाद आ. नितीन देशमुख यांनी व्यक्त केला.जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी सुद्धा आपले मत मांडताना सांगितले की शिवसैनिकांनी आता ताकदीने कामाला लागावे कारण ही लढाई आता आपल्या अस्मितेची आणि अस्तित्वाची निर्माण झालेली आहे.अशा पद्धतीने हजारी लोकांचा मेळावा आणि पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम अगदी दिमाखात संपन्न झाला यावेळी ज्ञानेश्वर परनाठे शेतकरीसेना जिल्हाप्रमुख, ब्रह्मकुमार पांडे तालुकाप्रमुख अकोट, अजय गावंडे तालुकाध्यक्ष तेल्हारा, जगन्नाथ निचळ , प्रशांत अढाऊ, हरिदिनी वाघोडे, गीता मोरे, अमोल पालेकर, श्याम गावंडे, विवेक खारोडे, मनोज खंडारे, सचिन थाटे, पुरुषोत्तम गावंडे, अतुल म्हैसणे विक्रम जायले, पप्पूशेठ सोनटक्के, उषाताई गिरनाळे, वनिताताई वाकोडे, शंकरराव ताथोड, गोपाल विखे, राजेश वानखडे, विक्रांत शिंदे, प्रल्हाद मोहोळ, प्रणव चोरे, गौरव आप्पा धुळे, गजानन मोरखडे, निलेश धनभर, दिलीप तराळे, गणेशराव चिकटे, सर्व शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय गावंडे सूत्रसंचालन सलमान खान यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post